जिंतूर - स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी जिंतूर बस स्थानक येथे स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. हे अभियान 1 वर्ष राबवण्यात येणार असून या स्वच्छ अभियानात जिंतूर बसस्थानक हळूहळू स्वच्छ होत असून आता या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (vnsnews24, feature )
तरी बस प्रवासी यांनी या अभियानाला आपला देश, राज्य, जिल्हा, तालुका व आपले बस स्थानक परिसरात स्वच्छ ठेऊन या अभियानाला चांगला प्रतिसाद द्यावा असे आव्हान आगार प्रमुख एम.बी. जवळेकर यांनी केले.
या वेळी बस स्थानक कर्मचारी एम.बी.वाटुरे, बी.पी चीबडे, एस.पी.भांबळे, पी.एस.मुंढे, जी.के. घुले, एन.डी. पांचाळ, प्रवासी महासंघ तालुकाध्यक्ष सचिन रायपत्रीवार, पत्रकार महेश देशमुख, रामप्रसाद दराडे, अजमत पठाण यांच्या उपस्थित आभियान राबवण्यात आले.
0 Comments