परभणी ➡️सध्या शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु झाल्या असून, पुढील वर्गात उच्चय शिक्षण घेताना विविध प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले आहे. (vnsnews-24, feature, parbhani )
विद्यार्थ्यांना सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात लागणाऱ्या प्रवेश तथा विविध शैक्षणिक योजनांसाठी उत्पन्न, रहिवाशी, वय अधिवास, जात आणि आर्थिक उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, केंद्रीय नमुन्यातील जात प्रमाणपत्र अशा विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. तसेच वरील सर्व प्रमाणपत्रांचे वितरण महसूल विभागामार्फत संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येते. ऐनवेळी अर्ज करून तातडीने मागणी करतात. परंतु, संगणकीय प्रणालीमध्ये किंवा अन्य तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास यंत्रणेची अडचण होते आणि ही प्रमाणपत्रे देण्यास विलंब होते. परिणामी विद्यार्थी शैक्षणिक लाभ घेण्यास पात्र असूनही वंचित राहण्याची शक्यता राहते.
त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या पाल्यास लागणारे वरील दाखले किंवा प्रमाणपत्र वेळीच अधिकृत ई महासेवा केंद्रांवरून परिपूर्ण अर्ज सादर करून काढून घ्यावेत. त्यामुळे त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व आर्थिक पिळवणूकही थांबेल. तसेच वरील सर्व प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणताही व्यक्ती वा ई-सेवा केंद्र संचालक अवाजवी रकमेची मागणी करत असल्यास तात्काळ उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन शेवाळे यांनी केले आहे.
0 Comments