Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ परभणी जिल्ह्यातील एक हजार ८२ वीजग्राहकांनी घेतला विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ




✴️ शंभर टक्के व्याजमाफीसाठी राहिले शेवटचे चार दिवस

✴️ कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना सवलत आणि पुनर्जोडणीची संधी

परभणी ➡️ कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीजग्राहकांना थकबाकीत सवलत देणाऱ्या विलासराव देशमुख अभय योजनेच्या माध्यमातूनखंडीत झालेला वीजपुरवठा पुर्ववत करून घेण्यासाठी आता केवळ चारच दिवस शिल्ल्क राहीले आहेत.  महावितरणने मार्चमध्ये सुरू केलेल्या या योजनेचालाभ घेण्याकरिता अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2022 ही शेवटची तारीख असून जास्तीत जास्तग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी  केले आहे. (vnsnews-24, feature, parbhani )   



खंडीत झालेला वीजपुरवठापुर्ववत करून घेण्यासाठी  परभणी जिल्हयातील  एक हजार ८२ वीजग्राहकांनी योजनेत सहभागी होत थकबाकी भरून पुन्हाआपले उद्योग-व्यवसाय सुरू करण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे. या योजनेत सहभागी झालेल्या परभणी जिल्हयातील एक हजार 82 वीजग्राहकांकडे 1 कोटी 88 लाख रूपयांची थकबाकी होती. या ग्राहकांना 32 लाख47 हजार रूपयांची सुट मिळाली आहे.





✴️ काय आहे विलासराव देशमुख योजना ? 


ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागूआहे. 31 डिसेंबर 2021 पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना योजनेचा लाभ घेतायेइल. योजनेत  ग्राहकांनी  थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरली तर त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्केमाफ करण्यात येणार आहे.तसेच  थकबाकीदार ग्राहकांनीमुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के तर लघुदाब ग्राहकांना 10 टक्के थकीत मुद्दल रकमेत अधिकची सवलत मिळणार आहे.





✴️ योजनेचा लाभ कसा घ्याल ? 


या योजनेत सुलभ हप्त्याने रक्कम भरावयाची सुविधा आहे परंतुत्यासाठी  मुद्दलाच्या 30 टक्के रक्कम एकरकमीभरणे अत्यावश्यक आहे. ग्राहकांना उर्वरीत रक्कम 6 हप्त्यात भरता येईल. योजनेच्या लाभार्थी  ग्राहकाने हप्त्यांची उर्वरित रक्कम भरली नाही तर माफ केलेली व्याज व  विलंब आकाराची रक्कम वीजबिलात पूर्ववत लागू करण्यातयेणार आहे.  महावितरणने थकबाकीच्या रक्कम वसुलीसाठीकोर्टात दावा दाखल केला असेल व ग्राहकांना योजनेतील सवलतीचा लाभ घ्यावयाचा असेल तरअशा ग्राहकांनी महावितरणला दाव्याचा खर्च (न्यायालयीन प्रक्रिया खर्च) देणे अत्यावश्यकराहील. जर ग्राहकांना या योजनेचा फायदा घेऊन वीजपुरवठा सध्या आहे त्याच  ठिकाणी पुन्हा सुरू करायचा झाल्यास महावितरण वीजपुरवठासुरू करेल, परंतु जर ग्राहकाला नवीन वीजजोडणी घ्यायची असल्यास नियमानुसार पुनर्जोडणी  शुल्क व अनामत रक्कम यांचा भरणा करावा लागेल. 



ज्या ग्राहकाला हप्त्याने थकीत रक्कम भरावयाची असेल अशा ग्राहकाने वीज कनेक्शन चालू केल्यावर चालू बिलाच्या रकमेसोबतठरवून दिलेल्या हप्त्याची रक्कम भरणे अनिवार्य असेल. ज्या ठिकाणी महावितरणच्या बाजूनेन्यायालयाने आदेश दिलेला असेल व 12 वर्षाच्या वर कालावधी लोटला नसेल व लाभार्थी ग्राहकानेकोठेही अपील केले नसेल तर अशा ग्राहकांनाही या योजनेचा फायदा घेता येईल. ज्या ग्राहकांचा वाद न्यायालयात  चालू असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना महावितरणच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावीलागणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनीलाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.(vnsnews-24, feature, parbhani )   








Post a Comment

0 Comments