Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना मिळणार 64 कोटी रुपये





स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या व किसान सभेच्या आंदोलनाला यश

परभणी ➡️ जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मिळणार 64 कोटी रुपये मिळणार असून स्वाभिमानी शेतकरी संघटना व किसान सभेने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. माजी खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली  बुधवारी (दि.17) दुपारी परभणी-गंगाखेड महामार्गावरील सिंगणापूर फाटा येथे दोन तास रास्ता रोको करण्यात आला.(vnsnews24, parbhani)


2700 रूपये प्रतिटन पहिली उचल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद 10 ऑक्टोबर 2023 रोजी ताडकळस येथे पार पडली. परभणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ह्या वर्षीच्या ऊसाला 3300 रूपये पहिली उचल द्यावी असे एकमताने ठरले. नंतर कारखाने सुरू झाले आणि कारखान्यांनी 2500 रूपये पहिली उचल जाहीर केली होती. ती संघटनेला मान्य नव्हती. त्यानंतर स्वाभिमानी व किसान सभा यांनी मिळून पाथरी तालुक्यातील लिंबा येथील योगेश्वरी साखर कारखान्यावर आंंदोलन केले तेव्हा तिथे ऊस दराची कोंडी फुटली. त्यांनी 2700 रूपये प्रतिटन दर देण्याचे जाहीर केले. त्यानंतर गंगाखेडच्या जी-7 शुगरने 2700 रूपये दर जाहीर केला. 



दोन कारखाने तयार नव्हते दर द्याला

श्री तुळजा भवानी शुगर, सेलू यांनी दोनशे रुपये वाढवत अंतिम दर 2600 रूपये जाहीर केला. परंतु त्यात श्री लक्ष्मी नृसिंह शुगर, आमडापुर व ट्वेन्टीवन शुगर, सायखेडा हे दोन कारखाने मात्र दर द्यायला तयार नव्हते. माजी खासदार राजु शेट्टी यांच्या मार्गदर्शनात बुधवारी (दि.17)बेमुदत रास्ता रोको आंदोलन आयोजित केले होते.


जिल्हाधिकारी आदेश 

त्या अनुषंगाने  जिल्हाधिकारी यांंच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यात या दोन कारखान्यास आदेश देण्यात आले होते. जिल्ह्यातील सात कारखान्यांपैकी पाच कारखाने 2700 रूपये किंवा त्यापेक्षा अधिक दर देतात मग तुम्ही द्यायला पाहिजे. जिल्हाधिकारी यांचे आदेश टाळून ह्यांनी दर वाढवले नाही. 


दोन तास चर्चा चालली

तेव्हा ठरल्याप्रमाणे आंदोलन सिंगणापूर फाटा येथे सुरू झाले. राजु शेट्टी व  अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे आणि कारखानदार यांच्यात चर्चा सुरू झाली. ही चर्चा दोन तास चालली. तोपर्यंत हा रस्ता शेतकर्‍यांनी अडवलेला होता. तेव्हा राजु शेट्टी  यांच्या सोबत फोनवरून श्री.लक्ष्मी नृसिंह शुगर कारखान्यांचे तिन्ही मालक प्रमोद जाधव, संजय धनकवडे व नागवडे यांनी संवाद साधला. तसेच ट्वेन्टीवन शुगरचे व्हॉईस चेअरमन विजय देशमुख यांनी सुध्दा संवाद साधत यावर्षी तुटणार्‍या ऊसाला 2700 रूपये दर देण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलकांनी व शेतकर्‍यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. 



यावेळेस जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिपक लिपणे, रामप्रसाद गमे,गजानन तुरे, रामराजे महाडिक, प्रसाद गरुड, मुंजाभाऊ लोडे, पंडित भोसले, तानाजी भोसले,  रुपेश शिंदे, शेख चाँद, विकास भोपळे, गजानन दुगाने, माऊली शिंदे, मयुर वाघमारे, राम दुधाटे ,नागेश दुधाटे, सचिन शिंदे, गिरीधर शिंदे, विष्णू दुधाटे आदी कार्यकर्ते व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









Post a Comment

0 Comments