परभणी ➡️ नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या वतीने ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय पात्रता परिक्षा – नेट परिक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेतील 151 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असुन परभणी कृषि विद्यापीठाच्या 50 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एवढया मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात तीन विद्यार्थी कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळ व्दारे आयोजित कृषि संशोधन सेवा भरती परीक्षेच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
विविध राज्यातील कृषि विद्यापीठे तथा कृषि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक व समकक्ष पदाकरिता राष्ट्रीय पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. एकुण 151 विद्यार्थी पैकी परभणी कृषि महाविद्यालयाचे 85 विद्यार्थ्यांचा समावेश असुन लातुर कृषि महाविद्यालयाचे 34 विद्यार्थी तसेच बदनापुर कृषि महाविद्यालयाचे 12 विद्यार्थी आहेत. परभणी येथील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे 16 विद्यार्थी नेट परिक्षेत उत्तीर्ण झाले असुन यात प्रशांत पावसे व विर शैलेश हे विद्यार्थी कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळ व्दारे आयोजित कृषि संशोधन सेवा भरती परीक्षेच्या लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
तर कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी नेट परिक्षेत उत्तीर्ण झाले असुन अजय सातपुते हा कृषि संशोधन सेवा भरती परीक्षेच्या लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. परभणी कृषि महाविद्यालयाचे 85 विद्यार्थी यशस्वी झाले असुन यात कृषि विद्याशाखेच्या 29, कृषि हवामानशास्त्राच्या 12, कृषि किटकशास्त्राच्या 11, विस्तार शिक्षण विभागाच्या 10, कृषि वनस्पतीशास्त्राच्या 08, मृदविज्ञान व रसायनशास्त्राच्या 05, उद्यानविद्याच्या 04, कृषि अर्थशास्त्राच्या 04, तर वनस्पती रोगशास्त्राच्या 02 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
लातुर कृषि महाविद्यालयाचे 34 विद्यार्थी यशस्वी झाले असुन यात कृषि किटकशास्त्राच्या 15, कृषी विद्याच्या 11, मृदा विज्ञान व रसायनशास्त्राच्या 04, कृषि वनस्पतीशास्त्राच्या 02, कृषि अर्थशास्त्राच्या 01, उद्यानविद्याच्या 01 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. बदनापुर कृषि महाविद्यालयाचे 12 विद्यार्थी यशस्वी झाले असुन यात कृषि विद्या शाखेच्या 08 तर कृषि किटकशास्त्राच्या 04bविद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या यशाबाबत शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, प्राचार्य डॉ.सय्यद ईस्माईल, डॉ.उदय खोडके, डॉ.अंगद सुर्यवंशी, डॉ.राकेश अहिरे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे कुलगुरू डॉ.ढवण यांनी अभिनंदन केले.
0 Comments