परभणी ➡️ जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा 144 टक्के पाऊस जास्त झाला असून मागील पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण पिके नामशेष झाली आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावे असे निवेदन भारतीय जनता पार्टी कडून जिल्हा प्रशासन आज देण्यात आले.
येत्या आठ दिवसात संपूर्ण पंचनामे नाही झाले तर परभणी भाजपाच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी याप्रसंगी उपस्थित भाजपा पदाधिकारी प्रदेश कार्यकारणी सदस्य संजय शेळके, संघटन महामंत्री, एन. डी देशमुख, गटनेत्या मंगलाताई मुदगलकर, नगरसेवक रितेश जैन,सुनील देशमुख, सरचिटणीस दिनेश नरवाडकर, संजय रिझवानी, तालुकाध्यक्ष,संदीप जाधव, डॉक्टर आघाडी जिल्हाध्यक्ष. डॉ मनोज पोरवल, अनु जाती जिल्हाध्यक्ष. उमेश शेळके व सर्व भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये निवेदन देण्यात आले
0 Comments