परभणी ➡️ जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा येथील 35 वर्षीय मजूर औरंगाबादहुन गावी येत असताना जालना जिल्ह्यातील नेर टोलनाक्याजवळ दुचाकी- ट्रक अपघातात युवक जागीच ठार झाल्याची घटना 26 एप्रिलच्या रात्री 9.30 च्या सुमारास घडली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा येथील शंकर रुस्तुमराव राठोड (वय 35 वर्ष) हा युवक औरंगाबाद येथे काही दिवसांपासून बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. दरम्यान तो कामानिमित्त आपल्या गावाकडे जाण्यासाठी दि.26 एप्रिल रात्री दुचाकी क्रमांक (एमएच - 22- ऐएस-5068) वरून एकटाच निघाला होता. दरम्यान जिंतूरकडे येत असताना जालना जिल्ह्यातील नेर टोलनाक्या जवळ एक मोठ्या वाहनाला पाठी मागून धडक दिल्याने तो युवक रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असता प्रवासी नागरिकांनी व जालना पोलिसांनी घटनास्थळाहून जालना घाटी रुग्णालयात दाखल केले. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. यावेळी शवविच्छेदन घाटी रुग्णालयात करण्यात आले. मयत युवकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.
0 Comments