माजीमंत्री तथा आ.बबनराव लोणीकर मार्गदर्शनाखाली हे आंदोलन यांच्या करण्यात आले. यावेळी माजी आ.अॅड.विजय गव्हाणे, भाजपयुमोचे प्रदेश सरचिटणीस,राहूल लोणीकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव, जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,गणेशराव रोकडे,प्रमोद वाकोडकर, अजय गव्हाणे, रामकिशन रौंदळे,अभय चाटे, शिवहरी खिस्ते, लिंबाजीराव भोसले, भीमराव वायवळ, मधुकर गव्हाणे, अनुप शिरडकर, सुनिल देशमुख, राजेश देशमुख, भागवत बाजगीर, बाळासाहेब फले, डी.एस.कदम, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत चौधरी, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत डहाळे, सादेक अली इनामदार, बाळासाहेब भालेराव आदी सोबत संतप्त पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयापासून बैलगाडीद्वारे महाबीजच्या कार्यालयावर धडक मारली.
तेथील प्रवेशद्वारावर ठाण मांडून या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि बोगस बीयाणे फेकून निषेध केला. महाबीजसह अन्य कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे विक्री करीत सर्वसामान्य शेतक-यांची अक्षरक्षः पिळवणुक केली आहे. केवळ चार जिल्ह्यातच 27 हजार क्विंटल बोगस बियाणे विक्री झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून या प्रकरणात याचिका दाखल केली. तसेच संबंधीत कंपन्याविरूध्द गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले. त्याही पलीकडे दोषी अधिका-यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करा, अशा कडक सुचना सुध्दा दिल्या.
0 Comments