परभणी, दि.30 जुलै :-
गेल्या अनेक वर्षांपासून परभणी येथील पत्रकारिते च्या क्षेत्रात उल्लेखनीय
कार्य करणारे उत्तम प्रल्हाद राव धायजे यांची नवी दिल्ली येथील इंडियन
रिपोर्टर्स असोसिएशन च्या हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ही भारत सरकारच्या मान्यतेने काम करणारी, संपूर्ण भारतातील सर्वात मोठा पत्रकार परिवार असलेली संस्था असून पत्रकारांसाठी काम करणारी विश्वसनीय संस्था असा या संस्थेचा नावलौकिक आहे. अशा या संस्थेच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी उत्तम प्रल्हाद राव धायजे यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे. याबाबतचे निवडीचे पत्र आणि ओळख पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले. उत्तम प्रल्हाद राव धायजे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या बाबींना प्रकाशात आणण्याचे काम आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून करत आहेत.
समाजातील अनिष्ट रूढी आणि परंपरा ना नष्ट करण्याबरोबरच दीन दुबळ्या आणि अन्यायग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे काम आपल्या समर्थ लेखणीच्या माध्यमातून करत उत्तम धायजे यांनी संपूर्ण परभणी जिल्ह्यांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. उत्तम धायजे यांनी केवळ अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले नसून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप अशा अनेक सामजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन या संस्थेने त्यांची हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ही भारत सरकारच्या मान्यतेने काम करणारी, संपूर्ण भारतातील सर्वात मोठा पत्रकार परिवार असलेली संस्था असून पत्रकारांसाठी काम करणारी विश्वसनीय संस्था असा या संस्थेचा नावलौकिक आहे. अशा या संस्थेच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी उत्तम प्रल्हाद राव धायजे यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे. याबाबतचे निवडीचे पत्र आणि ओळख पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले. उत्तम प्रल्हाद राव धायजे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या बाबींना प्रकाशात आणण्याचे काम आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून करत आहेत.
समाजातील अनिष्ट रूढी आणि परंपरा ना नष्ट करण्याबरोबरच दीन दुबळ्या आणि अन्यायग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे काम आपल्या समर्थ लेखणीच्या माध्यमातून करत उत्तम धायजे यांनी संपूर्ण परभणी जिल्ह्यांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. उत्तम धायजे यांनी केवळ अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले नसून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप अशा अनेक सामजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन या संस्थेने त्यांची हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 Comments