Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT / छत्रपती संभाजीनगरमध्ये हायवाच्या धडकेत तिघांचा मृत्यू




जिंतूरवनविभागाची परीक्षा देऊन राहत्या रूमकडे परतणाऱ्या तीन बहीण भावंडांचा हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास बीड वळण रस्त्यावरील बाळापूर फाट्याजवळील एका हॉटेल समोर घडली. (vnsnews24, feature ) 






झाल्टा फाट्याकडून जिंतूर तालुक्यातील प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे व लखन अंभोरे हे तिघेही भावंडे बाळापूर परिसरातून सातारा-देवळाई भागात असलेल्या रूमकडे परतत होते. सकाळीच वनविभागाच्या परिक्षेशी संबंधित मैदानी चाचणी देण्यासाठी तिघेही भावंडे दुचाकीवरून गेलेले होते. परतत असताना बाळापूर फाट्याजवळ  एक हायवा ट्रक खडीकच टाकून धूळ उडवत ओव्हरटेक करत सुसाट निघाला होता. मात्र पुढे जाताना अंभोरे भावंडांच्या दुचाकीला धडकला. दुचाकीवरील भावंडे एका बाजूने निघालेले असतानाही मागून येऊन हायवा धडकल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. 






या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस दाखल झाले. घटनास्थळी वनविभागाच्या परिक्षेचे प्रवेशपत्र आदी साहित्य विखरून पडलेले होते. त्यावरून पोलिसांना मृत भावंड्यांच्या राहण्याचा पत्ता मिळून आला. मृतांच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार अंभोरे भावंडे हे जिंतूरचे असून येथे सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगरमधील एका हॉटेलच्या मागील बाजू येथे राहायला होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तिन्ही भावंडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवून चिकलठाणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली.








Post a Comment

0 Comments