याबाबत भगवान क्षिरसागर यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की बोरी येथे 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी बोरी येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हे पाणी पावसाचे भिंतीमध्ये मुरले.
त्यामुळे 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता अचानक भिंत कोसळली . घरातील सावरा आवरा झाल्यामुळे त्यामध्ये जीवित हानी झाली नाही.
या घटनेमध्ये संसार उपयोगी साहित्य गहू, ज्वारी, कपडे, पलांग दाळ , टीव्ही ,कपाट कपाडे या घटनेमध्ये माळवद सुद्धा कोसळे. या घटनेमुळे क्षिरसागर कुटुंब उघड्यावर पडल्यासारखे झाले आहे.
या घटनेमध्ये एकूण अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे माहिती घरमालकांनी दिली. याबाबत महसूल विभागाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी क्षीरसागर कुटुंब यांनी केली आहे.
0 Comments