परभणी ➡️ तालुक्यातील धर्मापुरी येथे एका सालगड्याने गावातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.29) घडली. दरम्यान, गावकर्यांनी 24 तास अथक परिश्रम घेवून अखेर आज 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मृतदेह विहिरीबाहेर काढला. याबाबत परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार धर्मापुरी येथे सालगडी म्हणून मयत धोंडीराम आश्रोबा उकंडे (वय-42) हा काम करत होता. त्याने 29 ऑगस्ट रोजी मानसिक ताणातून गावाजवळील नितीन कदम यांच्या शेतातील 70 फूट खोल विहिरीत त्याने उडी मारली. गावकर्यांनी हा प्रकार पाहताच तात्काळ त्याला वर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. विहिरीत पाणी खूप असल्याने या कामात खूप अडचणी येत होत्या.
अखेर अग्निशमन दलाचे जवान व गावकर्यांनी मिळून साडेसात अश्वशक्तीची विद्युत मोटार लावून विहिरीतील पाण्याचा उपसा सुरु केला. आज मंगळवारी सकाळी पाणीपातळी कमी होताच धोंडीराम उकंडे याचा मृतदेह हाती लागल्यानंतर तो वर काढण्यात आला.
मयताच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. अग्नीशमन दलाचे कर्मचारी व ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कणके करत आहे.
0 Comments