Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पालम तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची अभिजीत भैय्या देशमुख मित्र मंडळाची मागणी 







पालम ( आरूणा शर्मा ) ➡️ येथिल अभिजीत भैय्या देशमुख मित्र मंडळ यांच्या कडून दिनाक 30 सप्टेबर रोजी तहसिलदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली आहे.


तालुक्यात दिनाक 26 सप्टेबर ते 29 सप्टेबर दरम्यान मोठया प्रमाणात तालुक्यात पाऊस झाल्यामुळे संपूर्ण तालुका जलमय झाल्याने तालुक्यातील प्रेत्यक महसूल मंडळामध्ये संपूर्ण खरीपाची पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे यात अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, झत्यादी पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे. 



सततच्या पाण्याच्या पुरामुळे शेतातील माती पुराच्या पाण्यामुळे खरडून गेली असल्यांमुळे हाताशी आलेले पिके उदवस्त झाली आहेत. काही भागा मध्ये तर शेतकऱ्यांची जनावरे वाहुन गेली.  पशुधनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मा.मुख्यमंत्री यांना निवेदना द्वारे विनंती करण्यात येते कि पालम तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा.



तालुक्यातील सरसगट शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रूपायाची नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना न्याय दयावा अशा मागणीचे निवेदन अभिजीत भैय्या देशमुख मित्र मंडळाचे पालम तालुका अध्यक्ष अकबर खा पठाण यांनी पालमचे तहसिलदार यांच्या मार्कत मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे.




Post a Comment

0 Comments