Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नुतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या जागी राजेश काटकर यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार सुपूर्द




आंचल गोयल जिल्हाधिकारी पदावर रुजू होऊ नये म्हणून सत्तारूढ पक्षाच्या नेतेमंडळींच्या प्रयत्नांना अखेर यश 

परभणी ➡️ नुतन जिल्हाधिकारी आंचल गोयल या परभणी जिल्हाधिकारी म्हणून शनिवारी (ता.31) रुजू होऊ नयेत म्हणून या जिल्ह्यातील काही सत्तारूढ पक्षाच्या नेतेमंडळींनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून गोयल यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला आहे.


आज  जिल्हाधिकारी मुगळीकर हे शनिवारी सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या या जागी नुतन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती गोयल या रुजू होणार होत्या. शनिवारी दुपारी त्या जिल्हाधिकारी या पदाचा पदभार स्वीकारतील असे अपेक्षित होते. त्यादृष्टीने त्या गेल्या दोन दिवसापूर्वी परभणीत दाखल झाल्या. विशेष त्यांची नियुक्ती ही 15 दिवसांपूर्वीच झाली होती. आज प्रशासकीय स्तरावर सुद्धा अधिकारी-कर्मचार्‍यांनी मुगळीकर यांना भावपूर्ण निरोप तसेच श्रीमती गोयल यांच्या स्वागताकरीता भक्कम तयारी सुरु केली होती. परंतु शनिवारी सकाळपासून नूतन जिल्हाधिकारी  आंचल गोयल या रुजू होऊ नयेत म्हणून या जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली. 



शुक्रवारी रात्रीपासूनच या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले होते. विशेषतः शासकीय स्तरावरून  गोयल यांच्यावर पदभार स्वीकारू नये म्हणून दबावतंत्राचा प्रकार सुरू होता. परिणामी सायंकाळी चार वाजेपर्यंत गोयल यांनी पदभार स्वीकारला नाही. त्यांच्याऐवजी कनिष्ठ अधिकार्‍यास जिल्हाधिकारी पदाचा पदभार सुपूर्त व्हावा या दृष्टीने काहींनी केलेल्या प्रयत्नांमुळे सायंकाळी मुंबईतून श्रीमती गोयल यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी काटकर यांना पदभार सोपवावा, असा आदेश धडकला. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार काटकर यांना सुपूर्द केला.

यात पालकमंत्री मलिक यांचे दोन दिवसांचा जिल्हा दौराचे नियोजन करण्यामागे हाच उद्देश तर नव्हता, अशी संशयाची सुई जात आहे. परंतु याविषयावर पालकमंत्री मलिक हे दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात होते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मलिक यांना या हालचालींसंदर्भात विचारणा केली. परंतु, या प्रकाराबाबत आपणास काहीही माहिती नाही, असे नमूद करीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. 

त्यामुळेच गोयल ह्या पदभार स्विकारणार नाहीत, त्यांच्या ऐवजी अन्य कनिष्ठ अधिकार्‍यास पदभार दिला जाईल, असे स्पष्ट संकेत दिसू लागले होते. अश्या प्रकारे महिलांकडे जिल्हाधिकारी पद जाऊ नये केले गेले नेतेमंडळींनी केलेला प्रयत्न हा  काही जागरुक नागरीकांना आवडले नाही. तसेच प्रशासकीय स्तरावर सुध्दा अधिकारी - कर्मचार्‍यांनी या नाट्यमय घडामोडींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. परंतु, काही नेते मंडळींच्या धास्तीपोटीच्या एकंदरीत हालचालींमुळे व वरिष्ठ पातळीवरुन त्यास मिळालेल्या प्रतिसादाने, प्रोत्साहनाने या नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम मिळाला. यामुळे आयएएस अधिकारी असणार्‍या आंचल  गोयल या प्रकाराने त्यांना लगेचच माघारी परतणार असल्याची माहिती हाती आली आहे.




Post a Comment

0 Comments