काळानुरुप स्थानिक स्वराज्यसंस्था व शासनाच्या ज्या काही सेवा सुविधा उपलब्ध आहेत. त्या मल्टीपर्पज हॉलसारख्या सुविधांचा अधिकाधिक कुशलतेने वापरावर भर दिला पाहिजे. अशा मोठया वास्तु वर्षातील केवळ काही दिवसापुरत्याच उपयोगात येण्याऐवजी इतर दिवसातही लोकांच्या उपयोगी पडल्या पाहिजेत. या दृष्टीने त्या त्या भागातील युवकांना त्यांच्या गरजेनुरुप प्रशिक्षणासाठी त्या उपयोगात आल्या पाहिजेत असेही त्यांनी स्पष्ट केले. जिंतूर येथील कबरस्तानाच्या जागेसंदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक घेवून हा विषय मार्गी लावू असे त्यांनी स्पष्ट केले.
कोव्हीड सारख्या आवाहनात्मक काळात परभणीला आपले सर्व कौशल्य पणाला लावून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलेल्या विशेष कामांचा पालकमंत्री नवाब मलीक यांनी गौरव केला. या बहुउद्देशीय सभागृहाच्या लोकापर्ण सोहळ्याच्या औचित्याने आपली आठवणही ही वास्तु जपुन ठेवेल असे भावनिक उद्दगार त्यांनी काढले. शासनातर्फे ज्या भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यांना न्याय देवू असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचे समोयोचित भाषण झाले. कोणतेही येणारे आवाहने आपल्या सोबत मार्ग घेवून येत असतात. फक्त सयमाने आपण त्यांना तोंड दिले पाहिजे असे मुगळीकर यांनी सांगितले.
0 Comments