जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुढील काळात नागरिकांनी स्वंयम् शिस्तीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना ज्यात तोंडाला मास्क लावणे, आस्थापना, व्यापारी दुकाने या ठिकाणी सॅनेटायझर व सामाजिक अंतर यांचे पालन करावे त्यामुळे नागरिकांनी तोंडाला मास्क लावावे, आस्थापना, व्यापारी दुकाने या ठिकाणी सॅनेटायझर व सामाजिक अंतर यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.
कोरोना कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने पुन्हा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढणार नाही याबाबत खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे श्री. मुगळीकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
मागील काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोना संसर्ग फैलावू नये यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. तसेच खबरदारी म्हणून इतरही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांची बाजारपेठ, दुकानांवर व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम हाती घेतली असून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. परंतू वरील उपाययोजना करूनही बाजारातील व सावर्जनिक ठिकाणी होणारी गर्दी पाहता शासनाने ठरवून दिलेल्या त्रिसुत्री ज्यात मास्क वापरणे, आस्थापना, व्यापारी दुकाने या ठिकाणी सॅनेटायझर व सामाजिक अंतर याचे पालन होत नसल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.
त्यामुळे पुढील काळात नागरिकांनी स्वयंम् शिस्तीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना मास्क, आस्थापना, व्यापारी दुकाने या ठिकाणी सॅनेटायइेर व सामाजिक अंतर याचे पालन न केल्यास प्रशासनास नाईलाजाने लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे मुगळीकर यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा, आस्थापना, व्यापारी दुकाने या ठिकाणी सॅनेटायइर व सामाजिक अंतर यासाठी जनतेने सहकार्य केल्यास रोगाचा प्रसार रोखण्यास फार मोठी मदत होणार आहे. आपण सर्व या आवाहनास प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी व्यक्त केली आहे.
VNSNEWS-24.COM कडून जनहितार्थ |
0 Comments