Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

हे सरकार सर्वार्थाने अपयशी असे सरकार - पंकजा मुंडे




 


परभणी ➡️ महाविकास आघाडीचे सर्वार्थाने अपयशी असे सरकार आहे. गेल्या वर्षभरात या सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. कोण्या वर्गास, घटकास मुळीच दिलासा दिला नाही. या सरकारची तीन तिघाडा काम बिघाडा, अशी अवस्था झाली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपासह मित्रपक्षाचा विजय म्हणजे सरकार स्थापनेची मुहूर्तमेढ ठरणार आहे, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (दि.26) परभणीत आयोजित केलेल्या एका मेळाव्यात व्यक्त केला.

वसमत रस्त्यावरील एमआयडीसीतील व्यंकटेश मंगल कार्यालायत आयोजित केलेल्या पदविधरांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे, माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, किशोर कोंडगे, प्रवीण घुगे, इद्रीस मुलतानी, माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद वाकोडकर, मोहन कुलकर्णी, रामप्रभू मुंडे, विठ्ठलराव रबदडे, अ‍ॅड. व्यंकटराव तांदळे, रामकिशन रौंदळे, अजय गव्हाणे, बाळासाहेब भालेराव, संजय रिझवाणी, मधुकर गव्हाणे, अजय गव्हाणे, राजेश देशपांडे, एन.डी. देशमुख, डॉ. राजेंद्र चौधरी, समीर दुधगावकर, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेऴी मुंडे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार सर्वार्थाने अपयशी असे सरकार आहे. गेल्या वर्षभरात या सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. कोण्या वर्गास, घटकास मुळीच दिलासा दिला नाही. या सरकारची तीन तिघाडा काम बिघाडा, अशी अवस्था झाली. कोण काय करतो, काय बोलतो, काय निर्णय घेतोय याचा मागमुसही लावणे अवघड झाले आहे. परंतु भाजपच्या सरकारने घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयास स्थगिती देणे हाच एककलमी कार्यक्रम या महाआघाडी सरकारने गेल्या वर्षभरात राबवला असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. विविध प्रभावी योजना, विकास कामे, शेतकरी हिताच्या निर्णयांना स्थगित बहाल करीत या सरकारने स्वतःचे हसे करून घेतले आहे. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा स्वागतार्ह्य निर्णयासही या बिघाडी सरकारने स्थगिती दिली. 

या सरकारलाच स्थगिती देण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे नमुद केले. पदविधर मतदारसंघातील निवडणूक ही क्रांतीकारी ठरणार आहे, असे स्पष्ट करीत मुंडे यांनी या निवडणुकीत भाजप व मित्रपक्षाचे उेदवार शिरीष बोराळकर यांचा विजय निश्रि्चत आहे. आपण सर्व एकजुटीने, एकदिलाने बोराळकर यांच्या मोठ्या मताधिक्याने विजयाकरिता प्रयत्न करू या, असे आवाहन केले. महाविकास आघाडीचा उमेदवार सर्वार्थाने अपयशी आहे. केवळ जातीपातीचा आधार घेतला जातो आहे. त्यांचा तो प्रयत्न कदापिही यशस्वी होणार नाही. कारण मराठा समाजाच्या आरक्षणासह विकासाकरिता भाजप व मित्रपक्षांनी सातत्याने सर्वार्थाने प्रयत्न केले आहेत. याउलट महाविकास आघाडीने या समाजास सर्वार्थाने वंचित ठेवण्याचा वर्षानुवर्षापासून पध्दतशीर असा प्रयत्न केला आहे, या गोष्टीच्या जाणीवा समाजबांधवांना आहेत. त्यामुळेच भाजप व मित्रपक्षास मोठे पाठबळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




Post a Comment

0 Comments