Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अक्षय कुमारने यावर संतप्त प्रतिक्रिया. ही क्रूरता कधी थांबणार? बलात्कारांना फाशी द्या





मुंबई
➡️ उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे 14 सप्टेंबर रोजी एका 19 वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्कारची घटना घडली होती. जखमी मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारदरम्यान आज दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीला बलात्कारानंतर बेदम मारहाण करण्यात आली होती, इतकेच नव्हे तर तिची जीभ कापून पाठीचे हाड मोडले होते. 


बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही क्रूरता कधी थांबणार? गुन्हेगारांना फाशी द्या, असे म्हणत अक्षय कुमारने आपला रोष व्यक्त केला आहे.या घटनेवर दुःख व्यक्त करताना अक्षय कुमारने ट्वीटद्वारे आपला राग व्यक्त केला आहे. 'संताप आणि मनःस्ताप. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण, कितीही क्रूरता. कधी थांबणार आहे हे सगळे? आपल्या कायद्याने आता अधिक कडक व्हायला पाहिजे की शिक्षा ऐकताच गुन्हेगार भीतीने थरथर कापला पाहिजे. गुन्हेगारांना फाशी द्या. महिलांच्या सुरक्षेसाठी सगळ्यांनी आवाज उठवूया, इतके आपण सगळेच करू शकतो', अशा कडक शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.




Post a Comment

0 Comments