परभणी ➡️ आषाढी एकादशीनिमित्त औरंगाबाद, अकोला आणि आदीलाबाद येथून पंढरपूर साठी दररोज तीन विशेष रेल्वे दि. 25जून ते 5 जुलै दरम्यान दररोज चालवण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. यासंदर्भात एक एक निवेदन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या प्रबंधक श्रीमती नीती सरकार यांना देण्यात आले. (vnsnews24, feature )
त्यात म्हटले आहे कि पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त मराठवाड्यातून लाखो भाविक पंढरपूर येथे जात असतात. दिनांक 25 जून ते पाच जुलै दरम्यान ही यात्रा सुरू आहे. या काळात औरंगाबाद -पंढरपूर ,अकोला- पंढरपूर आणि आदीलाबाद- पंढरपूर अशा तीन विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात याव्यात तसेच नियमित निजामबाद पंढरपूर गाडीला पाच अतिरिक्त डबे या काळात जोडण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर मराठवाड्यातील प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, रितेश जैन, डॉ. राजगोपाल कलानी बाळासाहेब देशमुख, शिवलिंग बोधने, माणिक शिंदे , कदिरलाला हाशमी, दत्तात्रय कराळे, विठ्ठल काळे, रुस्तुम कदम ,प्रकाश लाखरा,दयानंद दीक्षित,श्रीकांत गडापा आदींनी केली आहे*
0 Comments