जिंतूर ➡️ तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह गारासहित दिड तास अवकाळी पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुष्कान झाले आहे. (vnsnews-24 | feature | jintur)
आडगाव बाजार व परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी बियाच्या कांद्याची लागवड केली असून आजच्या चक्री वादळामुळे परीसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचे वाऱ्याचे प्रमाण इतके होते की समोरचा रस्ता दिसणे अवघड झाले होते. प्रशासनाने तात्काळ गहू,ज्वारी,हरबरा व बियांचा कांदा यांचे तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची सरसगट मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यानं मधून मागणी होताना दिसत आहे.
आडगाव बाजार वरून चितरनेर वाडी येथे जाणाऱ्या ओढ्याला चार ते पाच फूट पाण्याचा पूर आला असल्यामुळे चितरनेरवाडी येथील बाजारावरून जाणाऱ्या गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे.
0 Comments