जिंतूर ➡️ तालुक्यातील कौसडी परिसरात मागील अनेक दिवसांपासुन दररोज अंदाजे 200 वानर टोळी करून गावात येऊन धिंगाणा असल्यामुळे ग्रामस्थ पूर्णत्व वैतागले आहे.
कौसडी परिसरात मागील अनेक दिवसांपासून अंदाजे 200 वानर टोळ्या करून गावातील झाडांवर पत्रांवर तसेच घराच्या छतावर उड्या मारून धिंगाणे घालत असल्यामुळे पत्रे खिळखिळे होऊ लागली. तसेच छतावर ठेवलेले सोलर, पाण्याच्या टाक्या व इतर साहित्याची नासधूस केली जात आहे.
अनेक वेळा स्वयंपाक घरातुन भाकरी पळविण्याचे प्रकार घडले आहेत. या वानरांना अडविण्याचा प्रयत्न केला तर महिला मुलांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. वानरांच्या उपद्रवाला ग्रामस्थ पूर्णत्व वैतागले आहे. उपद्रव घालणाऱ्या वानरांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
0 Comments